Tag: #marathi
-
आपल्या मुलांना आपण काय द्यायला हवे??
“मी नेहमीच शिकायला तयार असतो, पण मला नेहमी शिकवलेले आवडत नाही.” विस्टन चर्चिल आजकाल मूल जन्माला येतं त्या क्षणापासूनच खरं तर आपण त्याला/तिला काही न काही देत असतो. अर्थात, आपल्या मुलांना सुरक्षित वातावरण, चांगल्या सोयीसुविधा, चांगलं शिक्षण या गोष्टी देणे हे आपलं कर्तव्यच असतं आणि हे कर्तव्य प्रत्येक पालक आपापल्या परीने पूर्ण करत असतो. किंबहुना…
-
भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय आणि ती खरंच महत्वाची असते का??
“तुमच्या भावना नक्कीच अनुभवा, पण त्यांना तुमच्या कृतीवर अधिकार गाजवू देवू नका!!” मागच्या लेखात आपण भावना म्हणजे काय आणि त्या ओळखायच्या कशा याबद्दल जाणून घेतले. आता आपण भावनिक बुद्धिमत्ता (emotional intelligence) या महत्वाच्या विषयाबद्दल जाणून घेऊया. खरंतर आत्तापर्यंत आपण बुद्धिमत्तेबद्दल खूप काही ऐकलं आहे. थोडक्यात सांगायचं तर अनेक गोष्टी शिकणे, नवीन परिस्थितीशी जुळवून घेणे, योग्य…
-
आपण खरंच आनंदी आहोत का …??
आनंद हा एक प्रवास आहे, गंतव्यस्थान (लक्ष्य) नाही!! आपल्याला सगळ्यांनाच आनंदी राहायचं असतं आणि म्हणून आपण सतत आनंद शोधत असतो. कधी कधी आपल्याला आपला आनंद सापडतो देखील पण बरेचदा हा खूप कमी वेळ टिकतो आणि मग पुन्हा आपण त्याच आनंदाच्या शोधात अस्वस्थ राहतो. खरं तर आनंद हा खूप व्यक्तीसापेक्ष अनुभव आहे, म्हणजे नेमका कशातून आनंद…
-
आपल्याला पालकत्व “शिकण्याची” खरोखर गरज आहे का??
स्वतःवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक मुलाच्या मागे एक पालक असतो ज्यांनी प्रथम त्यांच्या मुलावर विश्वास ठेवला असतो. अतिरेकी माहितीच्या या युगात जिथे आपण दररोज काय खावे, काय घालावे, कसे वागावे या सर्व गोष्टींबद्दल भरपूर माहितीचा सतत भडिमार होत असतो, तेथे त्या पैलूंबद्दल देखील आपण बहुतेकदा गोंधळलेले असतो जे अन्यथा आपल्याला खूप नैसर्गिक आणि क्षुल्लक वाटतात. पालकत्व…
-
आपण आपल्या सवयींचे गुलाम असतो का??
सवयीला जर वेळीच आवर घातला नाही तर ती गरज बनते!! “झोपेतून उठल्यावर हातात गरमागरम चहाचा कप आणि वर्तमानपत्र याशिवाय माझी सकाळच पूर्ण होत नाही.” “त्याला हाती घेतलेलं काम अपूर्ण ठेवायची घाणेरडी सवय आहे.” “छोटी दिशा तिच्या सगळ्या वस्तु अगदी नीट जागेवर ठेवते, किती छान सवय आहे ना तिला.” ही आणि अशी अनेक वाक्ये सतत आपल्या…
-
विचार-भावना आणि वर्तनाचे त्रिकुट !!
तुमचे विचार तुमच्या भावनांना प्रभावित करतात, तुमच्या भावना तुमच्या निर्णयांना प्रभावित करतात आणि तुमचे निर्णय तुमचं आयुष्य प्रभावित करतात. आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या घटना घडत असतात आणि आपण त्या घटनांना वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देत असतो. खरं तर आपल्याला वाटत असतं की आपला हा प्रतिसाद त्या घटनेमुळेच निर्माण होतो. पण मानसशास्त्रात असे सांगितले जाते की हे…
-
नाकावरच्या रागाचे करायचे तरी काय??
राग मनात धरून ठेवणे हे स्वतः विष पिऊन समोरच्या व्यक्तीच्या मरणाची वाट पाहण्यासारखे आहे. गौतम बुद्ध राग ही किती पटकन व्यक्त होणारी भावना असते ना ? म्हणजे बघा ना आपल्या इतर भावना जसे की आनंद, भीती, चिंता, समाधान, प्रेम, अपराधिपणा इत्यादि व्यक्त करायला आपण अनेकदा खूप आढेवेढे घेत असतो म्हणजे सहसा ह्या भावना आपण व्यक्त…
-
जावे छंदांच्या गावा..!!
आपलं आयुष्य म्हणजे खरंतर एक प्रवासच असतो. या प्रवासादरम्यान अनेक बरे वाईट अनुभव आपल्याला येत असतात. आणि हे सगळे अनुभव गाठीशी बांधून आपण पुढे मार्गक्रमण करत असतो. या आयुष्य नावाच्या प्रवासात आपल्याला अनेक प्रकारची सोबत मिळते. कधी ती आपल्या आप्तस्वकीयांची असते तर कधी मित्रमंडळींची!! या आपल्या जीवलगांच्या सोबतीने आपला हा प्रवास सुखकर होत असतो. पण…
-
आनंदाचे डोही….
आनंद.. हा शब्द ऐकला तरी मनात थुई थुई कारंजे उडायला लागतात. खरंच किती हवीहवीशी वाटणारी गोष्ट असतो हा आनंद! अर्थात दुसऱ्याचा आनंद बघून पोटात दुखणाऱ्या व्यक्तीही आपल्या आजूबाजूला असतातच. पण तरीसुद्धा आनंद मग तो स्वतःचा असो किंवा दुसऱ्यांचा सुखकारकच असतो. आपण सगळेच अविरतपणे या आनंदाच्या शोधत असतो. चला तर मग बघूया हवाहवासा वाटणारा हा आनंद…
-
मानसिक आरोग्याकडे वाटचाल!!!
आज १० ऑक्टोबर, जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून ओळखला जातो, त्यानिमित्याने हा लेखप्रपंच! ‘मन’ तसा आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे या मनाशी आपली ओळख खरे तर मराठी साहित्यातून झाली. अगदी लहानपणापासुनच आपल्याला मनाचे श्लोक आवर्जुन शिकवले जायचे आणि त्यावेळी त्याचा अर्थ जरी कळत नसला तरी, नित्यनेमाने आपण ते रोज म्हणत असू. मग पुढे शाळेत गेल्यावर…