Tag: #marathiblog
-
आपल्याला पालकत्व “शिकण्याची” खरोखर गरज आहे का??
स्वतःवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक मुलाच्या मागे एक पालक असतो ज्यांनी प्रथम त्यांच्या मुलावर विश्वास ठेवला असतो. अतिरेकी माहितीच्या या युगात जिथे आपण दररोज काय खावे, काय घालावे, कसे वागावे या सर्व गोष्टींबद्दल भरपूर माहितीचा सतत भडिमार होत असतो, तेथे त्या पैलूंबद्दल देखील आपण बहुतेकदा गोंधळलेले असतो जे अन्यथा आपल्याला खूप नैसर्गिक आणि क्षुल्लक वाटतात. पालकत्व…
-
नात्यांमधला गुंता सोडवायचा कसा??
जर आपण एकमेकांबद्दल न बोलता एकमेकांशी बोलू लागलो, तर जगातल्या बऱ्याचशा समस्या नाहीशा होतील!! आपण जन्माला येतो तेव्हापासूनच वेगवेगळ्या नात्यांशी आपली ओळख होते. काही नाती आपल्यासोबतच जन्माला येतात तर काही आपण आपल्या स्वतः साठी निवडतो पण अशी हि अनेक नाती अगदी मरेपर्यंत आपली सोबत करतात. आजकाल नातेसंबंधांविषयी खूप ओरड ऐकू येते. आधी कशी नाती खूप…
-
आपण आपल्या सवयींचे गुलाम असतो का??
सवयीला जर वेळीच आवर घातला नाही तर ती गरज बनते!! “झोपेतून उठल्यावर हातात गरमागरम चहाचा कप आणि वर्तमानपत्र याशिवाय माझी सकाळच पूर्ण होत नाही.” “त्याला हाती घेतलेलं काम अपूर्ण ठेवायची घाणेरडी सवय आहे.” “छोटी दिशा तिच्या सगळ्या वस्तु अगदी नीट जागेवर ठेवते, किती छान सवय आहे ना तिला.” ही आणि अशी अनेक वाक्ये सतत आपल्या…
-
पालकत्वाच्या विविध शैली आणि त्यांचे परिणाम!!
“मुलं कधीच त्यांच्या मोठ्याचं निमूटपणे ऐकण्यात चांगली नसतात, परंतु मोठ्यांचं अनुकरण करण्यात मात्र ती कधीच चुकत नाहीत!!” अमेरिकन लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता जेम्स बाल्डविन यांनी या वाक्यात खरंतर पालकत्वाच्या प्रवासातले एक महत्वाचे पण दुर्लक्षिलेले सत्यचं विषद केले आहे!! दुर्लक्षित अशासाठी कारण, आपल्या लहानपणापासूनच आपल्यावर मोठयांनी ऐकण्याचे संस्कार केले असतात आणि कळत-नकळत सवयीने आपणसुद्धा पालक झाल्यावर…
-
विचार-भावना आणि वर्तनाचे त्रिकुट !!
तुमचे विचार तुमच्या भावनांना प्रभावित करतात, तुमच्या भावना तुमच्या निर्णयांना प्रभावित करतात आणि तुमचे निर्णय तुमचं आयुष्य प्रभावित करतात. आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या घटना घडत असतात आणि आपण त्या घटनांना वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देत असतो. खरं तर आपल्याला वाटत असतं की आपला हा प्रतिसाद त्या घटनेमुळेच निर्माण होतो. पण मानसशास्त्रात असे सांगितले जाते की हे…
-
नाकावरच्या रागाचे करायचे तरी काय??
राग मनात धरून ठेवणे हे स्वतः विष पिऊन समोरच्या व्यक्तीच्या मरणाची वाट पाहण्यासारखे आहे. गौतम बुद्ध राग ही किती पटकन व्यक्त होणारी भावना असते ना ? म्हणजे बघा ना आपल्या इतर भावना जसे की आनंद, भीती, चिंता, समाधान, प्रेम, अपराधिपणा इत्यादि व्यक्त करायला आपण अनेकदा खूप आढेवेढे घेत असतो म्हणजे सहसा ह्या भावना आपण व्यक्त…
-
आनंदाचे डोही….
आनंद.. हा शब्द ऐकला तरी मनात थुई थुई कारंजे उडायला लागतात. खरंच किती हवीहवीशी वाटणारी गोष्ट असतो हा आनंद! अर्थात दुसऱ्याचा आनंद बघून पोटात दुखणाऱ्या व्यक्तीही आपल्या आजूबाजूला असतातच. पण तरीसुद्धा आनंद मग तो स्वतःचा असो किंवा दुसऱ्यांचा सुखकारकच असतो. आपण सगळेच अविरतपणे या आनंदाच्या शोधत असतो. चला तर मग बघूया हवाहवासा वाटणारा हा आनंद…